Thursday, September 29, 2011

॥ ॐ विष्णवे नमः ।।

॥ ॐ विष्णवे नमः ।।

॥ ॐ विष्णवे नमः ।।
आपल्या मन सतत ईश्वरीसेवेकडे आकर्षित व्हावे अशी व्यवस्था आपल्या उत्सवांची आहे. सध्या तुलसी विवाहाचा उत्सव मोठ्या प्रमाणात घरोघरी साजरा केला जात आहे. आज वैकुंठ चतुर्दशी या दिवशी विष्णुपूजेस फार महत्त्व आहे. आपण मनोभावे विष्णुची पूजा या दिवशी करावी. कोणत्याही कार्यास दैवी अधिष्ठान लाभल्या शिवाय, त्या कार्यात सुस्थिर असे सुयश प्राप्त होणे कठिण जाते असा अनेकांचा अनुभव आहे. यश प्राप्त होणे सहज साध्य असले तरी ते सत्याच्या मार्गाने यश प्राप्त होण्यासाठी लागणारी चिकाटी, सन्मार्गावरची अभेद्य निष्ठा , प्रबल आत्मविश्वास प्राप्त होण्यासाठी सत्यस्वरूप विष्णुची भक्ति यशप्रद ठरते. विष्णुची भक्ति कशी प्राप्त होईल याचा खुलासा श्रीभागवतात पुढिल प्रमाणे केला आहे.
श्रीभगवानुवाच
श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम्।
परिनिष्ठा च पूजायां सुतिभिः स्तवनं मम॥ (११-१९-२०)
भावार्थ- जे माझी भक्ति प्राप्त करू ईच्छितात , त्यांनी माझ्या अमृतमयी कथांवर श्रद्धा ठेवावी, नेहमी माझ्या गुंणाचे, लीलांचे, नावाचे गुणगान करावे, माझ्या पूजेवर निष्ठा व स्तोत्रांव्दारे माझी स्तुति करा. या उपदेशाचे विनम्रपणे पालन केल्यास आपल्या ह्रदयात वैकुंठाधिपती विष्णुची भक्ति निर्माण होणे सहज शक्य आहे. आपण सर्वशक्तीनीशी विष्णुची पूजा करावी. स्तोत्रपठण, विष्णुसहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, यासारख्या स्तोत्रांचे पठण मनातील श्रद्धा सबळ करते. तसेच ज्यांची आर्थिक कोंडी झाली असेल, किंवा आर्थिक स्थैर्यासाठी जे प्रयत्नशील असतील त्यांनी ॥ ॐ विष्णवे नमः ।। हा मंत्राचा रोज जप करावा. भगवान विष्णुच्या नामस्मरणाने सालंकृत घरास लक्ष्मीने स्वहस्ते अमेय यशाचे व अक्षय समाधाचे तोरण बाधणे, हे लक्ष्मी आपले आद्यकर्तव्य समजते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होऊन आशेचे नवे किरण दिसतील यात तिळमात्र शंका नाही. आपणहि याचा प्रयत्नपुर्वक अनुभव घ्या.